Sunday, April 14, 2019

आख्खी मुंबई

आख्खी मुंबई

समाधान मनाचे शोधताना दूर कुठेतरी निघून आलो
क्षणात बदलणारे जग सोडून समुद्रा काठी विसावलो


सोबतीला होता समुद्रापार येणारा मायेचा वारा
एक आठवणीने उजळून टाकला मनाचा आसमंत सारा


गंभीर हे सागरा खुशाल दे तू मला लोटून किनाऱ्यावर
येणार मी परत  तुझ्यावर स्वा होत, भेदत तुझी नजर


सांभाळ तुझे ते झरोके भुर्र्कन अंगाला स्पर्शून  उडतात
कानाला लावून चटका मला कशाला उगाच भांबवतात ?


आधी कधी केलंस नव्हतं असं माझ्यासोबत  जरी
 नको आहे का आज माझा सहवास, खरं सांग तरी


अरे तूच आहेस म्हणून असतो  आधार मला पुढे जायचा
नाहीतर कधीच निघून गेलो असतो पाहून रंग तुझ्या पाण्याचा


काहीतरी वाटलं तुझ्यात म्हणूनच येतो ना पुन्हापुन्हा 
विसरलो तुला आठवडाभर हाच का रे माझा गुन्हा?


सांगायला कितीतरी गोष्टी आहेत पण वेळ हवा थोडा अजून
खूप दिवसांनी भेटलो, बोलूया की आरामात बसून


तू आधी शांत हो म्हणजे शेजारी तुझ्या बसता येईल
बंद  कर खवळणंनाहीतर आख्खी मुंबई तुला शाप देईल



~ Baje 

No comments:

Post a Comment